Wednesday, March 17, 2021

डोळ्यामधले आसू पुसती, ओठांवरले गाणे


असे काही दिवस येतात जेव्हा आजूबाजूचं वातावरण अत्यंत सुंदर असतं तुमचा आवडता ऋतू असतो , वेळेत निघालात रस्त्याला गर्दी नाही वेळेत पोहोचलात. एकदम  चांगला चालू असतो दिवस  'पण'... हा 'पण' येतो आणि सगळं सगळं बिघडतं. मनातून बिघडतं . हा 'पण' आहे ना तो भलताच दांगट . कोणत्या ना कोणत्या कारणाने , कोणत्या ना कोणत्या रुपात रोज येत असतो. मग कधी त्याला आपण माणूस म्हणतो  तर  कधी नशीब . मग तो कामाच्या ठिकाणी , घरी , मंदिरात , दवाखान्यात आणि अगदी सोशल मीडियावर कुठेही येतो. 

या 'पण ' च्या अडथळ्यातून कोणी वाचलेला नाही. मग यातून आपण सुटतच नाही का ?  या 'पण' ला घालवायला येतात  ती 'माणसं' . आपली माणसं. आत्ता तुमच्या आजूबाजूला बघा तीच. आपण म्हणतो ना "या माणसाबरोबर vibe जुळते यार" हो तीच. 

तुम्ही विचार करा रणरणत्या उन्हात तुम्ही रस्त्यावरून जाताय आणि अचानक गुलमोहराच्या फुलांनी लगडलेले झाड तुमच्या समोर आले तेव्हा कसं वाटतं?  डोळ्यांनी जेव्हा दुरूनच तुम्ही ती फुलं बघता तेव्हा च शांत , छान वाटायला लागतं. तसं आपली माणसं ही आपल्या आयुष्याचा रस्त्यावरची ही सगळं सग्गळ देणारी झाडं. काही क्षण यांच्या सावलीत बसावं आणि पुन्हा आपल्या रस्त्याने चालू लागावं . तुम्ही बघाल तर ती झाडं आपल्या बरोबर येऊ लागतात. तुम्हाला एकदाच त्या झाडाशी मैत्री करायची आहे मग ते झाड आयुष्यभर तुमच्या बरोबर असेल. हां फक्त स्वार्थ नसावा तुमच्या मनात. 

शेवटी काय हो हा 'पण' येणारच . 

तरीही व्यथा असो , आनंद असो , प्रकाश असो किंवा तिमिर असो... जात पुढे मज राहणे हे आलंच .☺️

No comments:

Post a Comment