सार्वजनिक क्षेत्रात
सर्रास आढळणारा माणूस प्राणी म्हणजे शेजारी.ते घराशी निगडीत असो, बस, हॉटेल...
त्यांचा सहवास लाभल्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही.
देवाने माणसाची घडण
करताना त्याच्या बरोबर हा शेजारधर्म अशी एक गोड (आपल्यावर) गोष्ट देऊन पाठवली आहे.
“जरा साखर देता का?” ह्यासारख्या व्याख्यांनी शेजारधर्माला बदनाम करून टाकलंय. पण
तसा शेजार गुण्या गोविंदाने करायचा वगैरे
चा काळ गेला आणि आता “तुमचं पायपुसणं जर परत आमच्या दारात दिसलं तर खिडकीतून खाली
टाकून देऊ” असा चालू आहे. अलीकडली गोष्ट आहे.
दुपारचे ४ वाजले होते. ऊन
कमी झालं होत म्हणून मी मित्राकडे जायला बिल्डींग मधून खाली उतरलो आणि
पायऱ्यांच्या खिंडीतच मला गाठून घोसाळकर आजोबांनी दार उघडून मला विचारलं “काय?”
आता या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे मला कधीही कळलेल नाही. मराठीत असे प्रश्न
आहेत ज्यांची उत्तरच नाहीत . जस कि हे ‘काय?’ , ‘कसं काय?’, ‘कसं चाललय’ आणि
‘बाकी?’ मुळात ‘बाकी’ हा प्रश्न कसा आसू शकतो.गणिताच्या एका शिक्षकाला मराठी विषय
शिकवायला लागल्या मुळे शब्द मराठीत आला
असावा !!!! बाकी काही नाही .
“काय?” पुन्हा एकदा
त्यांनी विचारलं. मी काय या प्रश्नाला “काय?” याचं प्रश्नाने उत्तर दिल. “आज घरी
जंगी बेत होता म्हणे” (ते नामा म्हणे तुका म्हणे जसं संत वाङ्मयात आहे , तसं
शेजार-भंगात ‘होता म्हणे’ आहे. जो सगळ सांगतो तो होता!! ).
मी आपलं जेवढ आश्चर्य
दाखवता येईल तेवढं दाखवत “हो!!! तुम्हाला कसं कळल?” खर तर हो एवढं उत्तर देऊन
तिथून निसटता येता आलं असते पण आयत्या वेळी ह्या शेजार्यांकडे संमोहन शक्ती असते
दुसरे विचार च ते येऊ देत नाहीत.
“कळल मला .आज बाबा बरोबर
भाजी आणायला बाहेर पडलास ना ते पाहिलं मी खिडकीतून”
खर तर मी पण त्यांना
म्हणणार होतो पार्कात जायच्या नावाखाली कुठे जातात ते मी पण खिडकीतून पाहिलंय. पण
मी माझे पत्ते राखून ठेवतो.
“फ्लॉवर बटाटा भाजी आणि
आमरस , भजी पुऱ्या बेत उत्तमच कि” या काकांना हे सगळं कळल कुठून हा मला प्रश्न
पडला .पण मग काही महिन्यानंतर मला कळल कि हि एक gang आहे. हे सोसायटी मधले आजोबा
लोक under home एक संस्था चालवतात. एकमेकांना सगळ्या बातम्या कळत असतात हे मला
आमच्या घरचा बेत अख्ख्या बिल्डींग ला कळला तेव्हा लक्षात आलं.
“ तुम्हला माहितीच आहे न
सगळं “ मी जरा अंमळ वैतागून बोललो
“शेवटच वर्ष न रे तुझं “
या विषयावर
“हो आणि बहुतेक तुमचं
सुद्धा” हा हन्त!!! हे वाक्य बोलताना मी त्यांच्या gang च्या मूळ विषयावरच घाव
घातला. आणि नंतर आई बाबां चे अनेक घाव , वार मला सोसावे लागले . थोडक्यात कोण शेजारी ठरवायचे आपल्या नशिबात नाही. मी म्हणेन
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असतील तर शेजार गाठ हि सुद्धा गत जन्मीच्या
पाप पुण्यावरून च बांधली जाते.
अशीच एका शेजार्याशी माझी
गाठ एका पुस्तक प्रदर्शनात पडली. आपल्या
आवडीची पुस्तक घायला मी तिथे गेलो होतो.आणि अगदी गर्दी नसेल अश्या वेळेस गेलो
होतो. पण म्हणायला प्रदर्शनात गर्दी होती (२० माणस!!! पुस्तक प्रदर्शनात हि गर्दीच
म्हणायची). मी कविता सेक्शन च्या इथे कुसुमाग्रज,बोरकर वगैरे पुस्तक बघत असताना
अगदी शेजारून “वाह वाह” असा आवाज आला. मी एकवार पाहिलं तर एक वाचक सादरीकरणाच्या
तयारीत दिसत होता. कोणाच्या तरी कवितांच पुस्तक हातात होत. आणि वाह वाह मुद्दाम
माझं लक्ष जावं आणि मी प्रेक्षकाच काम कराव या साठी केलं होत. मी आपलं स्मितहास्य
केलं . त्यावरून त्याने ‘कोणती कविता असेल बर’ असा विचार मी केला असावा असा त्याने
विचार करून ते पुस्तक माझ्या समोर धरलं “वाचून बघ तरुणांच्या कविता आहेत” पुस्तकाच
नाव होत ‘तृणाचे पिवळे देठ’.
“अच्छा”
“एक एक कविता म्हणजे
तरुणांच्या मानत काही तरी करून दाखवण्यासाठी प्रेरित करते.आता हि बघ” असं म्हणून
त्यांनी कविता ऐकवायला सुरवात केली
“ डोंगराचा कडा आहे काळा
काळा
मनाला लावलाय ताळा ताळा
विचार म्हणताय पळा पळा
काळा कडा दिसतो लांब
त्याच्या वर जाऊन थांब
(वर या शब्दावर इतक्या मोठ्या आवाजात जोर दिला कि आजूबाजूचे लोक दचकून बघायला
लागले )
दिसेल तिथून जग सारे
मोठा हो, मोठा हो प्यारे
डोंगराचा कडा आहे काळा
काळा “
हि कविता ऐकून ती कविता
फाडून ‘जाळा जाळा’ असं मला झालं होत .त्यानंतर जवळपास पाऊण तास मला स्फूर्तीदायक
कविता ऐकवल्या गेल्या. ह्या माणसाच्या शेजाऱ्याने ते पुस्तक लिहिलेलं होतं आणि हा
माणूस उत्तम शेजार धर्म पाळत होता.त्या स्फूर्तिदायक कवितांनंतर मी कोणतही पुस्तक
न घेता घरी परतलो .
मला हा त्रास सतत होतो
गाण्याचा कार्यक्रम , नाटक , चित्रपट हा शेजार मला अतिशय त्रासदायक ठरलाय. मागे
एकदा एका नाटकाला गेलो होतो. उशिरा पोहोचल्यामुळे मागची सीट मिळाली होती....
क्रमशः
मस्त रे अमोघ
ReplyDeleteNice one bhaiii��
ReplyDeleteLoved it! ♥️
ReplyDelete