प्रिय,
पु.ल.
आजपासून तुमचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आहे. सर्वप्रथम वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुम्ही लिहिलेले लेख, तुमचे नाट्यप्रयोग, तुमची गाणी आणि याही पेक्षा तुम्ही लोकांना जे हसवलंय या सर्वांचा सार( अमृतच खरंतर) ह्या वर्षात कार्यक्रमांच्या माध्यमातून होणार आहे.
कार्यक्रमावरून आठवलं मागे एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे गटणे, अंतू बर्वा, या पात्रांवर सादरीकरण चालू होतं. लोक त्या शब्दात आणि नाट्यात इतके रंगले होते की पात्रांनी म्हणण्याआधी पुढचं वाक्य प्रेक्षकांमधून येत होत.
लहानपणी पुस्तकांचं वेड तुम्ही लावलं. तुम्हाला प्रत्यक्ष पाहू शकलो नाही हे आमच्या पिढीचं दुर्दैवच म्हणायचं. पण तुम्हाला जे ऐकलंय, वाचलंय, त्यावरून निश्चित सांगू शकतो की लाडके व्यक्तिमत्त्व हे नुसतंच लाडकं नसून आदर्श सुद्धा होतं आणि आहे. अनेकांसाठी देवासारखे धावून जाणाऱ्या तुम्हाला देव मानण्याची गरजच वाटली नाही.
पाडगावकर लिहितात "पुल स्पर्श होताच दुःखे पळाली.... निराशेतूनी माणसे मुक्त झाली जगू लागली हास्य गंगेत न्हाली" किती समर्पक ओळी
या हास्यगंगेमध्ये आपली सर्व दुःख धुवून माणसं आजही जगायला शिकले आहेत आणि जगताय, जगवताय. आज लहान मुलांना सुद्धा पुल पाठ आहेत तो वाचतो, संवाद बोलतो, कुणी गाणं म्हणतं, कुठे फुलराणी फुलायला लागते; कारण या हास्य गंगेचा उगम तुमच्या हृदयापासून झाला आणि तो मिळाला या सर्वांच्या हृदय सागराला.
खरंच स्वर्गात ब्रह्मदेवाने विचारल्यानंतर तुमच्या आधी अगणित प्रेक्षकांनीच ब्रह्मदेवाला उच्च स्वरात सांगितलं असेल "की या माणसाने आम्हाला हसवलं" आणि ब्रह्मदेवाने सुद्धा हसत हसत मान्य केलं असेल यात काही शंकाच नाही. त्यांची काय आता चैन आहे पृथ्वीलोका वरील न संपणारे किस्से त्यांना स्वर्गात बसून ऐकता येणार आहेत आणि खरोखरच स्वर्गसुख मिळणारे हे नक्की.
पुन्हा एकदा शुभेच्छा.
तुमचाच,
अमोघ वैद्य
पु.ल.
आजपासून तुमचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आहे. सर्वप्रथम वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुम्ही लिहिलेले लेख, तुमचे नाट्यप्रयोग, तुमची गाणी आणि याही पेक्षा तुम्ही लोकांना जे हसवलंय या सर्वांचा सार( अमृतच खरंतर) ह्या वर्षात कार्यक्रमांच्या माध्यमातून होणार आहे.
कार्यक्रमावरून आठवलं मागे एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे गटणे, अंतू बर्वा, या पात्रांवर सादरीकरण चालू होतं. लोक त्या शब्दात आणि नाट्यात इतके रंगले होते की पात्रांनी म्हणण्याआधी पुढचं वाक्य प्रेक्षकांमधून येत होत.
लहानपणी पुस्तकांचं वेड तुम्ही लावलं. तुम्हाला प्रत्यक्ष पाहू शकलो नाही हे आमच्या पिढीचं दुर्दैवच म्हणायचं. पण तुम्हाला जे ऐकलंय, वाचलंय, त्यावरून निश्चित सांगू शकतो की लाडके व्यक्तिमत्त्व हे नुसतंच लाडकं नसून आदर्श सुद्धा होतं आणि आहे. अनेकांसाठी देवासारखे धावून जाणाऱ्या तुम्हाला देव मानण्याची गरजच वाटली नाही.
पाडगावकर लिहितात "पुल स्पर्श होताच दुःखे पळाली.... निराशेतूनी माणसे मुक्त झाली जगू लागली हास्य गंगेत न्हाली" किती समर्पक ओळी
या हास्यगंगेमध्ये आपली सर्व दुःख धुवून माणसं आजही जगायला शिकले आहेत आणि जगताय, जगवताय. आज लहान मुलांना सुद्धा पुल पाठ आहेत तो वाचतो, संवाद बोलतो, कुणी गाणं म्हणतं, कुठे फुलराणी फुलायला लागते; कारण या हास्य गंगेचा उगम तुमच्या हृदयापासून झाला आणि तो मिळाला या सर्वांच्या हृदय सागराला.
खरंच स्वर्गात ब्रह्मदेवाने विचारल्यानंतर तुमच्या आधी अगणित प्रेक्षकांनीच ब्रह्मदेवाला उच्च स्वरात सांगितलं असेल "की या माणसाने आम्हाला हसवलं" आणि ब्रह्मदेवाने सुद्धा हसत हसत मान्य केलं असेल यात काही शंकाच नाही. त्यांची काय आता चैन आहे पृथ्वीलोका वरील न संपणारे किस्से त्यांना स्वर्गात बसून ऐकता येणार आहेत आणि खरोखरच स्वर्गसुख मिळणारे हे नक्की.
पुन्हा एकदा शुभेच्छा.
तुमचाच,
अमोघ वैद्य
Masta Amogh!
ReplyDeleteMastach re Moghya! ❤
ReplyDeleteवेड्या, पु ल नई हे वाचायला हावय यार !
ReplyDeleteEkadam kadak
ReplyDeleteEk number mitra...radawlas aani hasawlas suddha...����������
ReplyDeleteवाह अमोघ ,मस्तच रे....
ReplyDeleteमित्रा, तोडलंस
ReplyDeleteKhup bhari👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteभावना पोहोचल्या तुझ्या पु.लं.पर्यंत. खूप छान
ReplyDelete